🕒 1 min read
नागपूर : राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. बकरी ईदसंदर्भात आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) गौसेवा आयोगाच्या आदेशावर प्रश्न उपस्थित करत सरकारला उद्देशून टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी ठाकरेंनी आपले आडनाव बदलून “खान” किंवा “शेख” ठेवावे, असा टोला लगावला.
Aditya Thackeray should change his surname to “Khan” or “Sheikh”; Nitesh Rane
राणे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले आदित्य जर अशा प्रकारची भूमिका घेत असतील, तर त्यांना ठाकरे हे आडनाव वापरण्याचा अधिकार नाही.” ते पुढे म्हणाले की, “सण साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेण्याचा सल्ला फक्त हिंदूंनाच का दिला जातो? जसे हिंदू समाज होळी, दिवाळी इको फ्रेंडली करतो, तसेच मुस्लिमांनीही इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करावी.”
दरम्यान, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नितेश राणेंना नोटीस दिली होती. त्यावर राणे यांनी पलटवार करत म्हटले की, “प्यारे खान यांनी मुस्लिम समाजाचे प्रबोधन करणे अपेक्षित आहे. इको फ्रेंडली बकरी ईद ही समाजहिताची बाब आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, यासाठीच माझा सल्ला होता.”
नितेश राणे यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “माझा हेतू कोणत्याही धर्माचा अपमान करण्याचा नाही. शांत महाराष्ट्र हवा असल्यास सर्व समाजांनी संयम आणि समजूतदारपणा दाखवावा.”
📌 महत्वाच्या बातम्या
- कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं गुपचूप लग्न, रॉकीसोबत नव्या आयुष्याची सुरुवात
- RCB ने जिंकला IPL 2025, पण कमाईच्या शर्यतीत मुकेश अंबानी नंबर वन
- अनुष्काने मिठी मारताच विराट कोहली भावुक; RCBच्या ऐतिहासिक विजयाने मैदानावर ढसाढसा रडला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








