Share

ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनचं मौन अखेर सुटलं

Abhishek Bachchan opens up on personal life, social media trolls, and his upcoming film on ZEE5.

Published On: 

Abhishek Bachchan finally breaks his silence on divorce talks with Aishwarya

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) यांच्या नात्याबाबत गेल्या काही काळात अनेक तर्क-वितर्क, अफवा आणि चर्चांना उधाण आलं होतं. सोशल मीडियावर दोघे क्वचितच एकत्र दिसू लागल्यानंतर, घटस्फोटाच्या चर्चांना आणखी फाटा मिळाला. मात्र यावर खुद्द अभिषेक बच्चननेच आता मौन सोडले आहे.

एका मुलाखतीत अभिषेकने स्पष्टपणे सांगितलं की, “माझ्या वैयक्तिक आयुष्यावर लोक जे काही बोलतात, त्याचा मला फारसा फरक पडत नाही. पण जेव्हा या गोष्टी माझ्या कुटुंबाला दुखावतात, तेव्हा ते असह्य होतं. नकारात्मकतेचा आजार पसरवणाऱ्या लोकांनी त्यांच्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहायला हवं.”

Abhishek Bachchan finally breaks his silence on divorce talks with Aishwarya

ट्रोलिंगच्या वाढत्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करत अभिषेक म्हणतो, “आज एखाद्याच्या पोस्टवर काहीही लिहिणं फार सोपं झालं आहे. पण हे करताना लोक विचारच करत नाहीत की, समोरच्याला खरंच यातून त्रास होतो. अशी वक्तव्यं करणाऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो, जर तुमचं काही म्हणणं असेल, तर समोर येऊन सांगा.”

एक किस्सा सांगताना अभिषेकने स्पष्ट केलं की, एका ट्रोलरच्या आक्षेपार्ह्य कमेंटवर त्याचा मित्र सिकंदर खेरने थेट आपला पत्ता पोस्ट करत त्या ट्रोलरला आमनेसामने बोलण्याचं आव्हान दिलं होतं. “हिम्मत असेल तर समोर या आणि बोला,” असं आव्हान खुद्द अभिषेकनेही दिलं.

दरम्यान, अभिषेक बच्चन लवकरच ‘कालीधर लापता’ या झी5 वरील चित्रपटात झळकणार आहे. हा थरारपट ४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Entertainment News
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या